Latest

…..तर देशात सोयाबीन, सूर्यफूल, शेंगदाणेसह सर्व खाद्यतेलाच्या किमती कमी होणार ! सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

खाद्यतेल स्वस्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सणासुदीच्या काळात वाढणारी मागणी आणि महागाईचा दबाव लक्षात घेता, केंद्र सरकार खाद्यतेलावरील मूलभूत आयात शुल्कात ५ टक्क्यांपर्यंत कपात करण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे.

आयात शुल्क कमी झाल्यास परदेशातून येणारे पाम, सोयाबीन आणि सूर्यफूल तेल तुलनेने स्वस्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारातील खाद्यतेलाच्या किमतींवर काही प्रमाणात नियंत्रण मिळू शकते.

भारत आपल्या खाद्यतेलाच्या गरजेपैकी जवळपास दोन तृतीयांश हिस्सा आयातीद्वारे पूर्ण करतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील दरांचा थेट परिणाम देशांतर्गत किमतींवर होतो.

मात्र सरकारसमोर शेतकऱ्यांच्या हिताचेही आव्हान आहे. आयात शुल्कात बदल करताना देशातील सोयाबीन आणि तेलबिया उत्पादकांना योग्य भाव मिळावा, याचाही विचार केला जाणार आहे. म्हणजेच, सणासुदीआधी खाद्यतेल स्वस्त होणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button