Latest

अहिल्यानगरात पावसाचा पॅटर्न बदलला ! दुष्काळी दक्षिणेत जास्त पाऊस, तर बागायती उत्तरेत कमी, कोणत्या तालुक्यात जास्त पाऊस?

अहिल्यानगरात यंदा पावसाने सगळेच अंदाज उलटे केले आहेत! नेहमी दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या दक्षिणेकडील तालुक्यांवर यंदा वरुणराजाची विशेष कृपा झाली आहे. कर्जत, श्रीगोंदे, पारनेर आणि जामखेडमध्ये चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. पण आश्चर्याची बाब म्हणजे बागायती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तर भागात अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाला आहे.

विशेषतः राहुरीमध्ये केवळ ५७.२ मिमी पाऊस झाल्याने पाणीटंचाईची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात एकूण पावसाचे प्रमाण गेल्या वर्षापेक्षा जास्त असले, तरी खरिपाच्या पेरणीत तब्बल ६५ हजार हेक्टरची घट झाली आहे. दमदार पाऊस न झाल्यामुळे मुग, उडीद, बाजरी आणि सोयाबीनच्या पेरणीची वेळ जवळपास संपली असून अनेक शेतकरी आता सूर्यफूल आणि मका यांसारख्या कमी कालावधीच्या पिकांकडे वळण्याची शक्यता आहे. यंदाचा पाऊस केवळ आकडे बदलत नाही, तर अहिल्यानगरच्या शेतीचे संपूर्ण गणितच बदलताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button