
मंडळी, आपल्या देशात अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत, पण काही मंदिरांमध्ये आजही प्रवेशासाठी अत्यंत कडक धार्मिक नियम पाळले जातात. विशेष म्हणजे, काही ठिकाणी पंतप्रधानांपासून प्रसिद्ध कलाकारांपर्यंत अनेकांना प्रवेश नाकारण्यात आला आहे.
ओडिशातील जगन्नाथ पुरी मंदिर हे त्यातील सर्वात चर्चित उदाहरण मानले जाते. येथे गैर-हिंदूंना प्रवेश दिला जात नाही. 1984 मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला होता.
केरळमधील गुरुवायुर श्रीकृष्ण मंदिरातही फक्त हिंदूंनाच प्रवेश आहे. प्रसिद्ध गायक के. जे. येसुदास हे ख्रिश्चन असल्यामुळे त्यांनाही मंदिरात प्रवेश मिळाला नव्हता.
वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराच्या काही भागांमध्ये गैर-हिंदू आणि परदेशी नागरिकांच्या प्रवेशावर निर्बंध आहेत. तसेच तामिळनाडूमधील कामाक्षी अम्मन मंदिर आणि कपालेश्वर मंदिरातही मुख्य गाभाऱ्यात प्रवेशासाठी धार्मिक नियम पाळले जातात.
या मंदिरांच्या व्यवस्थापनानुसार, शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या परंपरा आणि धार्मिक नियम जपण्यासाठी हे निर्बंध लागू आहेत. त्यामुळे श्रद्धा, परंपरा आणि धार्मिक प्रथांबाबत आजही देशात मोठी चर्चा होताना दिसते.





