Latest

एल निनोचा इशारा ! यंदा फक्त ८८% पाऊस ? शेतकऱ्यांनी आत्ताच सावध व्हा !

मंडळी, राहुरीतील मातापूर येथे आयोजित खरीप पूर्व नियोजन मेळाव्यात कृषी विभागाने महत्त्वाचा इशारा दिला आहे. यंदाच्या खरीप हंगामावर ‘एल निनो’चा प्रभाव राहण्याची शक्यता असून सरासरीच्या केवळ ८८ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

उपविभागीय कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांनी सांगितले की, कमी पावसामुळे पिकांवर पाण्याचा ताण निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आतापासूनच योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.

कमी पाण्यात येणारी आणि कमी कालावधीत तयार होणारी मटकी, मूग यांसारखी पिके निवडण्याचा सल्ला देण्यात आला. तसेच ऊस उत्पादन वाढवण्यासाठी योग्य वाण, खत व्यवस्थापन, पाणी नियोजन आणि आंतरमशागतीबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

सहाय्यक कृषी अधिकारी तृप्ती तनपुरे यांनी घरच्या घरी बियाणांची उगवण क्षमता तपासण्याचे प्रात्यक्षिकही दाखवले. बदलत्या हवामानात शास्त्रोक्त शेती आणि योग्य नियोजन हाच शेतकऱ्यांसाठी यशाचा मंत्र ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button