Latest

मुळा धरणात किती पाणी शिल्लक ? एक निर्णय… आणि पाण्याचं भविष्य बदलणार

मुळा धरणाच्या पाणीसाठ्यामुळे यंदाचा उन्हाळा निर्धास्त पार पडणार असला तरी पुढील वर्षासाठी चिंता कायम असल्याचे चित्र समोर येत आहे. सध्या धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याने येत्या १५ मेपासून उन्हाळी आवर्तन पूर्ण क्षमतेने सुटण्याची शक्यता आहे, ज्याचा फायदा अहिल्यानगर शहर, राहुरी कृषि विद्यापीठ, एमआयडीसी तसेच पाच ते सहा तालुक्यांतील शेतीला होणार आहे.

धरणात सध्या ७,४२८ क्युसेक्स उपयुक्त पाणीसाठा असून त्यापैकी पिण्यासाठी आणि औद्योगिक वापरासाठीही पाणी राखीव ठेवण्यात आले आहे. जानेवारीत रब्बी हंगामात कमी पाणी वापरल्यामुळे यावेळी सुमारे ४५ दिवसांचे आवर्तन देणे शक्य झाले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची सध्याची चिंता कमी झाली आहे.

मात्र अल नीनोच्या संभाव्य प्रभावामुळे यावर्षी पावसाळा कमी झाला किंवा पावसात मोठे अंतर पडले, तर पुढील वर्षी जानेवारीपासूनच पाण्याची टंचाई जाणवू शकते, असा इशारा जलतज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे सध्या परिस्थिती समाधानकारक असली तरी भविष्यातील पाण्याच्या नियोजनाबाबत सतर्क राहणे गरजेचे असल्याचे स्पष्ट होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button